पुणे, ऑक्टोबर २०२५: तरूण व्यावसायिकांसाठी निवृत्ती हा एक दूरचा विषय वाटू शकतो, परंतु नियोजनात विलंब केल्याने मोठी किंमत मोजावी लागते. गृहकर्ज, लग्न आणि कुटुंब नियोजन अशा तात्काळ गोष्टींना प्राधान्य दिले गेले तरी निवृत्तीसाठी बचत पुढे ढकलल्याने अनेकदा आयुष्यात नंतर आर्थिक असुरक्षितता निर्माण होते.
पारंपारिकपणे, भारतात निवृत्तीला नियोक्ता पेन्शन, संयुक्त कुटुंब प्रणाली आणि मध्यम ध्येयांनी पाठिंबा दिला आहे. आज, आधार संरचना विकसित झाली आहे. वाढत्या आयुर्मानासह, वाढत्या आरोग्यसेवा खर्च आणि महागाईसह, दीर्घकालीन बचतीला धक्का बसत आहे. विभक्त कुटुंबांनी आंतरपिढीतील कुटुंबांची जागा घेतली आहे आणि कमी व्यवसाय हमी पेन्शन प्रदान करत आहेत, त्यामुळे व्यक्ती आता स्वतःच्या निवृत्ती सुरक्षित करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) च्या वार्षिक अहवाल २०२३-२४ नुसार, राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) सारख्या पेन्शन योजनांमध्ये सहभाग वाढतच आहे, तरीही भारताच्या काम करणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत कव्हरेज कमी आहे. हे निष्कर्ष आयुष्यात लवकर निवृत्ती नियोजन सुरू करण्याची निकड अधोरेखित करते, कारण उशीरा तयारी केल्याने अनेकदा आर्थिक असुरक्षितता आणि नंतर पश्चात्ताप होतो.
सुमारे ३८ टक्के भारतीयांना हे लक्षात आले आहे की निवृत्तीचे नियोजन वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी सुरू झाले पाहिजे ही सकारात्मक बाब आहे. आर्थिक जागरूकता वाढणे, डिजिटल सुविधांची व्यापक उपलब्धता आणि सुरुवातीच्या टप्प्यातील कृतींमुळे दीर्घकाळात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची वाढती जाणीव या बाबी सकारात्मक आहेत. वेळेची शक्ती प्रचंड आहे. उदा. आपण ६० वर्षांपर्यंत १० टक्के वार्षिक परतावा देऊन दरमहा १०,००० रुपये गुंतवले, तर हे घडते:
- ३५ वर्षांपासून सुरूवात केल्यास निवृत्तीनंतरचा निधी सुमारे १.३४ कोटी रूपये असेल.
- ५० वर्षांपासून सुरू केल्यास त्याच व्यक्तीला फक्त २० लाख रुपये मिळतील. फरक मोठा आहे- वेळेमुळे गोष्टी बदललेल्या दिसतात.
“लवकर नियोजन करणे ही एक फक्त चांगली गोष्ट नाही तर अनिश्चित भविष्याच्या सुरक्षेसाठी ही अत्यावश्यक बाब आहे. त्यातून लोकांचे आत्मविश्वास, निवड आणि मनःशांतीसोबत सक्षमीकरण होते,” असे मत अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष अनुराग गुप्ता यांनी व्यक्त केले.
तंत्रज्ञानामुळेही प्रक्रियेला एक नवीन आयाम प्राप्त होत आहे. निवृत्तीवेतन कॅल्क्युलेटर्स, मोबाइल एप्स आणि रोबो सल्लागार आता नियोजन सोपे, पारदर्शक आणि सहजसाध्य करतात. त्यामुळे लोकांना प्रगतीवर लक्ष ठेवून वेळेत समायोजन करणे शक्य होते.
भारत २०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा या स्वप्नाच्या दिशेने कार्यरत असताना निवृत्तीचे नियोजन वैयक्तिक सुरक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक स्थैर्यासाठीही महत्त्वाचे आहे. शाळा, कार्यस्थळे आणि समाजात याला आर्थिक मुख्य प्रवाहात आणल्यामुळे भारतीयांना आत्मविश्वासाने निवृत्त होता येईल.
वयाच्या ३५ वर्षांपूर्वी नियोजन हा त्याग नाही तर ते सक्षमीकरण आहे. ही एकच आर्थिक मालमत्ता आहे जी परत मागता येत नाही. तुम्ही जितक्या लवकर नियोजन कराल तितके त्याचे फायदे जास्त असतात.