मुंबई, जून 2025 – भारतातील सर्वात विश्वासार्ह संस्थांपैकी एक असलेल्या गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्सने आज त्यांच्या सर्व्हिस सीआरएमची घोषणा केली. वेगाने वाढणाऱ्या स्मार्ट होम सेगमेंटमध्ये ग्राहकांचे पाठबळ सार्थकी लावण्यासाठी डिझाइन केलेला हा एकत्रित, विक्री नंतरच्या सेवांचा संपूर्ण भारतभरातील प्लॅटफॉर्म आहे. उत्कृष्ट ग्राहक अनुभवाद्वारे प्रीमियमायझेशनच्या ब्रँडच्या वचनबद्धतेशी सुसंगत असा हा प्लॅटफॉर्म 80+ विभाग, 200+ सेवा केंद्रे आणि 6,500+ पिन कोडमध्ये 2 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देते, जो ग्राहक-केंद्रित डिजिटल नवोपक्रमात एक महत्त्वाचा टप्पा आहे.
कनेक्टेड लिव्हिंग हे आजकाल सर्वमान्य असताना, भारतातील ₹6,000 कोटींच्या लॉक उद्योगात विक्रीनंतरची सेवा हा एक महत्त्वाचा फरक ठरतो आहे. नवीन सर्व्हिस सीआरएम ग्राहकांना अधिक सक्षम करते. कोणत्याही गोष्टीला जलद रिस्पॉन्स, वन-टच तक्रार नोंदणी आणि स्मार्ट तसेच पारंपरिक लॉकिंग सोल्यूशन्ससह सर्वसमावेशकता प्रदान करते, ज्यामुळे प्रत्येक टचपॉइंटवर सुविधा, प्रतिसाद आणि मनःशांती निश्चित होते.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्सचे बिझनेस हेड श्री. श्याम मोटवानी म्हणाले, “ग्राहकांप्रती असलेली आमची जबाबदारी ही खरेदीच्या ठिकाणी संपत नाही तर सुरू होते, असा आमचा विश्वास आहे. सर्व्हिस सीआरएम हा एक डिजिटल-फर्स्ट उपक्रम आहे जो आमचा सेवा अनुभव सुलभ आणि मजबूत करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जो त्याला अधिक सर्वसमावेशक, कार्यक्षम आणि पारदर्शक बनवतो. आम्ही सुरक्षित केलेल्या प्रत्येक घराला आधार मिळावा याची खात्री करणे ही आमची वचनबद्धता आहे.”
सर्व्हिस सीआरएम भौतिक आणि डिजिटल सेवा पायाभूत सुविधांना एका बुद्धिमान प्रणालीमध्ये एकत्रित करते, ज्यामुळे यात स्मार्ट लॉक मालकांसाठी सक्रिय सहभाग, केंद्रीकृत सेवा इतिहास, थेट अद्यतने आणि जलद निराकरण करणे शक्य होते आहे. डिजिटल लॉकचे प्रश्न सोडवणे असो किंवा पारंपरिक हार्डवेअरसह मदत करणे असो, हा प्लॅटफॉर्म संपूर्ण भारतात उत्कृष्टतेचे एकसमान मानक सुनिश्चित करते.
ग्राहकांच्या समाधानापलीकडे, सर्व्हिस सीआरएम दीर्घकालीन ब्रँड वाढीसाठी एक धोरणात्मक पाया देखील रचते. लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्सने FY25 मध्ये ₹1,000 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवला आणि आता FY28 पर्यंत ₹2,500 कोटींच्या महत्त्वाकांक्षी महसुलाचे लक्ष्य ठेवले आहे. सेवा कार्यक्षमता सुधारून, ग्राहकांचा विश्वास बळकट करून हे ध्येय साध्य करण्यात हे व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
घराच्या सुरक्षेतील भारतातील सर्वात स्थापित आणि विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक असलेली ही कंपनी स्मार्ट लॉक तंत्रज्ञानाचा पाया रचण्यातच नव्हे तर वाढत्या डिजिटल ग्राहक वातावरणात विक्रीनंतरच्या उत्कृष्टतेची पुनर्परिभाषा करण्यात ब्रँडच्या नेतृत्वाची पुष्टी करते.