नाट्यमय घटना : ३ मुलांच्या आईने पतीला सोडून काकूसोबत केले लग्न; गावकऱ्यांनी पकडले आक्षेपार्ह अवस्थेत

By: Editor_Pratik

On: Sunday, June 1, 2025 8:26 AM

Google News
Follow Us

वैशाली (बिहार): चकसिकंदर मंसूरपूर गावात एक धक्कादायक आणि नाट्यमय प्रकार समोर आला आहे. तीन मुलांची आई असलेल्या पारो देवी हिने आपल्या पतीला सोडून गावातीलच रूपेश राम या तरुणाशी ग्रामपंचायतीसमोर थेट विवाह केला. विशेष म्हणजे, पती रमेश राम याने या संबंधास विरोध न करता फक्त मुलांना आपल्याकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

ही घटना त्यावेळी उघडकीस आली जेव्हा पारो देवी आणि रूपेश राम यांना गावकऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर गावात मोठा गोंधळ झाला आणि रूपेशने स्वतः पंचायत बोलावली. या पंचायतीत पारोचा पती रमेश रामही उपस्थित होता.

पंचायतीदरम्यान, रूपेश रामने पारो देवीच्या भांगेत सिंदूर भरत तिला पत्नी म्हणून स्वीकारले. यावेळी रमेश राम म्हणाले, “माझी पत्नी कुणासोबत राहते, हे तिचं स्वातंत्र्य आहे. मी फक्त इतकंच सांगतो की तीन मुलांपैकी मुलं माझ्याकडे राहावीत.” रमेश यांच्या या प्रतिक्रियेमुळे ग्रामस्थही काहीसे स्तब्ध झाले.

या प्रकरणात एक वेगळा वळण तेव्हा आला जेव्हा पारो देवीने सांगितले की तिच्या तिसऱ्या मुलाचा जन्म रूपेशमुळे झाला आहे. रूपेशनेही हे मान्य करत सांगितले की तो तीनही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे. मात्र, मुलं नेमकी कुणाकडे राहतील, यावर अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

रूपेश आणि पारोने दोघांनीही मान्य केले की त्यांचं प्रेमसंबंध मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. रूपेशने पारोला आर्थिक मदतही केली होती, तसेच तिच्यासाठी अनेक वस्तू आणल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, पारो देवी ही नात्याने रूपेशची काकू लागते आणि तिचं घर त्याच्या घराजवळच आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026