मुंबई, मार्च २०२६: युद्धाचे वातावरण असो किंवा बाजारपेठेत मोठी चढ- तार होत असो, गुंतवणूकदार घाबरून जातात आणि पैसे गुंतवण्यास धजावत नाहीत, हे खूपच सामान्य आहे. अशा परिस्थितीत लोक थांबून किंवा माघार घेऊन परिस्थिती सुधारण्याची वाट पाहू लागतात. परंतु इतिहासाने दाखवून दिले आहे की, कमाईच्या सर्वोत्तम संधी अनेकदा अशाच कठीण काळात चालून येतात.
कठीण काळात गुंतवणूक करणे फायदेशीर का आहे? जेव्हा जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा लोक नवीन शेअर्स खरेदी करणे कमी करतात किंवा थांबवतात. अनेक जण घाबरून स्वतःकडील शेअर्स विकू लागतात, ज्यामुळे किमती घसरतात. कधीकधी तर लोक भीतीपोटी स्वतःहून ‘स्टॉप लॉस’चा वापर करून आपली गुंतवणूक विकून टाकतात. कठीण परिस्थितीत थोड्या काळासाठी बाजारात अस्थिरता येते, पण दीर्घकाळात याचा बाजारावर फारसा वाईट परिणाम होत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, यापूर्वी अनेकदा असे दिसून आले आहे की अशा संकटांनंतर बाजार आणखी तेजीत येतो.
संतुलन राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. संकटाच्या काळात गुंतवणूक केल्याने कधीकधी लवकर आणि चांगला नफा मिळू शकतो, तर कधीकधी सुधारणा होण्यासाठी मोठा काळही लागू शकतो. फायदा अनेकदा त्यांनाच होतो जे संयम राखतात आणि चढ-उताराच्या वेळीही आपल्या योजनेवर ठाम राहतात.
दीर्घकालीन गुंतवणूक करणारे लोक संकटाच्या काळातही का यशस्वी होतात, याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
१. भीतीमुळे कमी किमतीत चांगल्या संधी: संकटाच्या वेळी लोक घाबरून आपले शेअर्स विकू लागतात, ज्यामुळे चांगल्या कंपन्यांचे शेअर्सदेखील कमी किमतीत मिळू लागतात. समजूतदार गुंतवणूकदारांसाठी खरेदीची ही एक सुवर्णसंधी असते.
२. बाजार अपेक्षेपेक्षा लवकर सावरतो: इतिहासाने दाखवून दिले आहे की, मोठ्या जागतिक घडामोडी झाल्या तेव्हा भारतीय शेअर बाजारात थोडी अस्थिरता आली पण नंतर ते अतिशय वेगाने वर आले.
३. योग्य वेळ निवडण्यापेक्षा बाजारात टिकून राहणे उत्तम: ज्या गुंतवणूकदारांनी मागील संकटांच्या काळात आपला पैसा बाजारात टिकवून ठेवला, त्यांना ‘कंपाउंडिंग’चा जबरदस्त फायदा मिळाला, जो बाजारामध्ये योग्य वेळेची वाट पाहणाऱ्यांना कधीच मिळाला नाही.
ऐतिहासिक पुरावा: संकटाच्या काळात बाजाराने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कसा फायदा मिळवून दिला
संकटाचा काळ — मग तो देशांतर्गत सुरक्षेशी संबंधित असो किंवा जागतिक भू-राजकीय तणावामुळे असो—अनेकदा बाजारपेठेत अल्पकाळासाठी चढ-उतार निर्माण करतो. मात्र, ऐतिहासिक आकडेवारी सांगते की, ‘निफ्टी ५०’ ने दीर्घकाळात अतिशय चांगली कामगिरी केली आहे. ज्या संयमी गुंतवणूकदारांनी अशा अनिश्चित काळात बाजारात टिकून राहणे पसंत केले किंवा अधिक गुंतवणूक केली, त्यांना यातून मोठा आर्थिक लाभ झाला आहे.
उदाहरणार्थ, देशांतर्गत अनिश्चिततेच्या काळात, सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजाराने एका वर्षात ३५% पर्यंत आणि दोन किंवा तीन वर्षांनंतर १००% पेक्षाही जास्त वाढ दर्शविली आहे. हो, ही सुधारणा नेहमीच लगेच झाली नाही; काही वेळा गुंतवणूकदारांना बाजार पुन्हा रुळावर येण्यासाठी थोडी जास्त वाटही पाहावी लागली.
त्याचप्रमाणे, जेव्हा भू-राजकीय तणावामुळे तेलाच्या किमतीत चढ-उतार झाले, तेव्हा बाजार सावरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला. अशा वेळी एका वर्षानंतर बाजारपेठेत १% ते ५०% दरम्यान वाढ दिसून आली आणि दोन वर्षांनंतर ही वाढ ७% ते १२०% किंवा त्याहूनही अधिक राहिली. सुधारणेतील हे चढ-उतार हे स्पष्ट करतात की, जरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना शेवटी फायदा मिळाला असला, तरी बाजार कधी आणि किती वेगाने पुन्हा वर येईल, याचा अंदाज लावणे कठीण असते.
| संघर्ष | दिनांक | १ महिना आधी | १ महिना नंतर | ३ महिने नंतर | ६ महिने नंतर | १ वर्ष नंतर | २ वर्षे नंतर | ५ वर्षे नंतर |
| कारगिल युद्ध | मे १९९९ | -९% | +१७% | +३२% | +३७% | +३६% | +१६% | +८२% |
| मुंबई २६/११ | नोव्हेंबर २००८ | +७% | +४% | +१% | +५०% | +८२% | +१०९% | +१२०% |
| उरी हल्ला | सप्टेंबर २०१६ | +२% | -१% | -८% | +४% | +१५% | +२८% | +१००% |
| पुलवामा हल्ला | फेब्रुवारी २०१९ | ०% | +६% | +४% | +३% | +१३% | +४१% | +१०३% |
| ऑपरेशन सिंदूर | मे २०२५ | +१०% | +२% | +१% | +४% | लागू नाही | लागू नाही | लागू नाही |
स्रोत: एन.एस.ई. मागील कामगिरी ही भविष्यातील परताव्याची सूचक नाही. परतावा, प्रमुख घडामोडींच्या सापेक्ष ‘निफ्टी ५० इंडेक्स‘ची कामगिरी दर्शवतो.
तेल आणि जागतिक संकट — भारतीय शेअर्सवर (निफ्टी ५०) होणारा परिणाम
| संघर्ष | दिनांक | १ महिना आधी | १ महिना नंतर | ३ महिने नंतर | ६ महिने नंतर | १ वर्ष नंतर | २ वर्षे नंतर | ५ वर्षे नंतर |
| आखाती युद्ध | ऑगस्ट १९९० | +२१% | +२१% | +२३% | -४% | +५०% | +१२८% | +१९९% |
| इराक युद्ध | मार्च २००३ | -४% | -८% | +७% | +२९% | +६८% | +१०६% | +३४६% |
| लिबियातील गृहयुद्ध | फेब्रुवारी २०११ | -३% | -१% |





