बाजारपेठेतील उतारचढावांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुंतवणूकदारांची मिड-कॅप क्षेत्राला पसंती

पुणे, फेब्रुवारी २०२६: आजच्या काळात एकीकडे शेअर बाजारात तेजीची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे सावधगिरी बाळगण्याचीही गरज आहे. अशा परिस्थितीत, सामान्य गुंतवणूकदार भविष्यात चांगला नफा मिळवण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहेत. सध्याच्या बाजारचक्रातमिडकॅप म्युच्युअल फंडपुन्हा एकदा गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहेत.

या बदलत्या दृष्टिकोनामागे जागतिक आणि देशांर्गत, अशी दोन्ही कारणे आहेत. जागतिक स्तरावर, अमेरिका आणि युरोपसारख्या मोठ्या आर्थिक सत्तांमधील सुधारत असलेल्या व्यापारी संबंधांमुळे व्यवसायाचे वातावरण अधिक सुधारण्याची आशा आहे. या बदलांमुळे अशा कंपन्यांसाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, ज्यांचे कामकाज परदेशातील निर्यात आणि उत्पादन क्षेत्राशी जोडलेले आहे.

देशांतर्गत पातळीवर विचार केल्यास, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, उत्पादन आणि भांडवली खर्चावर जो भर देण्यात आला आहे, त्याचा मोठा सकारात्मक परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होईल अशी अपेक्षा आहे. सरकारी खर्च वाढून खाजगी क्षेत्रात हालचाल वाढेल, तशी वस्तू आणि सेवांची मागणी केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित राहणार नाही. याचा थेट फायदा त्या मध्यम आकाराच्या कंपन्यांना मिळू शकतो, ज्या देशाच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेल्या आहेत.

याचाच परिणाम म्हणून संपूर्ण २०२५ सालातमिडकॅपश्रेणीत गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मिडकॅप फंड्समध्ये येणाऱ्या गुंतवणुकीने म्युच्युअल फंड उद्योगाचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हा प्रवाह जानेवारी २०२६ मध्येही कायम राहिला, जिथे या श्रेणीत ,१८५ कोटींची गुंतवणूक झाली. हे आकडे स्पष्टपणे दर्शवतात की, गुंतवणूकदारांचा विश्वास अशा भारतीय कंपन्यांवर वाढत आहे ज्यांच्यात वेगाने प्रगती करण्याची क्षमता आहे.

देशभरातील सकारात्मक वातावरण पाहता, टाटा मिडकॅप फंड (मुख्यत्वे मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणारी एक ओपनएंडेड इक्विटी योजना) बद्दल पुण्यासारख्या प्रादेशिक बाजारपेठांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येत आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत, या फंडाची अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) सुमारे२६.१० कोटींवर पोहोचली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यात २७% वाढ झाली आहे. (अंतर्गत आकडेवारी)

पुण्यामध्ये या फंडाची पकड सातत्याने मजबूत होत आहे. जानेवारी २०२६ च्या आकडेवारीनुसार, पुण्यातून टाटा मिडकॅप फंडाची एकूण विक्री .२९ कोटी झाली आहे. (स्रोत: अंतर्गत आकडेवारी) हे आकडे स्पष्ट करतात की, पुण्यातील गुंतवणूकदार अशा इक्विटी योजनांकडे आकर्षित होत आहेत, ज्या त्यांना भारताच्या विकास प्रवासात सहभागी होण्याची संधी देतात.

टाटा अॅसेट मॅनेजमेंटचे फंड मॅनेजर श्री. सतीश मिश्रा यांच्या मते, सध्याची आर्थिक परिस्थिती अशा कंपन्यांसाठी अनुकूल आहे ज्यांना आपला विस्तार वेगाने करायचा आहे. ते म्हणाले की, २०२६ मध्ये आपल्याला असा बदल पाहायला मिळत आहे, जिथे देशांतर्गत भांडवली खर्च आणि वाढत्या उपभोगाचा सर्वाधिक फायदा मध्यम स्तरावरील कंपन्यांना मिळत आहे. ‘मिडकॅप स्ट्रॅटेजीमुळे गुंतवणूकदारांना याउभरत्या ब्लूचिपशेअर्समध्ये अशा वेळी गुंतवणूक करण्याची संधी मिळते, जेव्हा ते अद्याप खूप मोठी नावे बनलेले नसतात. ज्यांना दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी हे फंड उत्तम आहेत.”

मिडकॅप फंडांच्या बाजूने असणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे संतुलित व्हॅल्यूएशन. सध्या निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्सचा पीई रेश्यो (P/E ratio) ३० ते ३५ च्या दरम्यान आहे. याचा अर्थ असा की, मिडकॅप शेअर्सच्या किमती या लार्जकॅपसारख्या अतिशय स्थिर नाहीत आणि स्मॉलकॅपसारख्या खूप महागही नाहीत. अर्थात, याचा अर्थ हे शेअर्स स्वस्त आहेत असा होत नाही, पण त्यांच्या किमती सध्या योग्य मर्यादेत असून त्या प्रमाणाबाहेर वाढलेल्या दिसत नाहीत.

भविष्यात चांगल्या वाढीची अपेक्षा असली, तरी टाटा म्युच्युअल फंड नेहमीच शिस्तबद्ध गुंतवणुकीचा सल्ला देतो. लार्जकॅपच्या तुलनेत मिडकॅप शेअर्समध्ये चढउतार थोडे जास्त असू शकतात, त्यामुळे फंड हाऊस गुंतवणूकदारांना एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सुचवत आहे.

मिडकॅप फंडांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये गुंतवणुकीचामध्यम मार्गसाधण्याची क्षमता असते. जिथे लार्जकॅप फंड्समध्ये चढउतार कमी असतात आणि स्मॉलकॅप फंड्समध्ये वाढीच्या संधीसोबतच जोखीमही जास्त असते, तिथे मिडकॅप फंड्स या दोन्हीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच, यामध्ये तुम्हाला चांगली वाढ आणि नियंत्रित जोखीम, अशा दोन्ही गोष्टींचा फायदा मिळू शकतो.

भारताचा हा विकासप्रवास जसा पुढे जात आहे, त्यासोबतच उत्तम प्रशासन असलेल्या भक्कम व्यवसायांना ओळखणे, हे टाटा मिडकॅप फंडाचे उद्दिष्ट आहे. सामान्य गुंतवणूकदारांच्या बचतीचे रूपांतर भविष्यातील मोठ्या भांडवलात करण्यासाठी आणि त्यांना दीर्घकाळात संपत्ती निर्माण करून देण्यासाठी हा फंड कार्यरत आहे.