पुणे, जून : दिवसाची सुरुवात जशी होते, तसाच संपूर्ण दिवसाचा सूर ठरतो. निरोगी आणि पौष्टिक सकाळच्या सवयींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाच्या वतीने पुण्यातील शेरेटन ग्रँड येथे ‘हर सुबह की सुपर शुरुआत : कॅलिफोर्निया बदामांतील २४ पोषकतत्त्वांचे सामर्थ्य’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात मॅक्स हेल्थकेअर, नवी दिल्ली येथील आहारतज्ज्ञ तथा डायटेटिक्स विभागाच्या प्रादेशिक प्रमुख ऋतिका समद्दार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ जॉकी उत्सवी यांनी केले. अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्यासह जीवनशैली क्षेत्रातील प्रभावक साक्षी अग्रवाल, शिल्पा मेहर आणि हर्षा खत्री यांनी सहभाग घेत सकाळच्या पौष्टिक सवयींचे महत्त्व अधोरेखित केले.
चर्चेदरम्यान दिवसाच्या सुरुवातीला घेतलेले अन्न आणि जीवनशैलीविषयक निर्णय दीर्घकालीन आरोग्यावर कसा परिणाम करतात, यावर भर देण्यात आला. सहभागी मान्यवरांनी आपल्या अनुभवांच्या आधारे सांगितले की, दैनंदिन आहारात कॅलिफोर्निया बदामांचा समावेश केल्यास आरोग्यदायी सवयी सहजपणे अंगीकारता येतात.
ऋतिका समद्दार म्हणाल्या, “निरोगी जीवनशैलीसाठी गुंतागुंतीच्या उपायांची गरज नसते. सातत्याने पाळता येतील अशा साध्या सवयीच सर्वाधिक प्रभावी ठरतात. संतुलित नाश्ता किंवा सकाळच्या आहारात बदामांचा समावेश केल्यास आरोग्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होते.”
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण नाश्ता टाळतात किंवा झटपट पण अपौष्टिक पदार्थांकडे वळतात. अशा परिस्थितीत प्रथिने, आरोग्यदायी चरबी, तंतुमय घटक, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्व ‘ई’सह २४ पोषकतत्त्वांनी समृद्ध असलेले कॅलिफोर्निया बदाम सकाळच्या आहारासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतात, असे तज्ज्ञांनी नमूद केले.
अभिनेत्री उर्मिला कानेटकर म्हणाल्या, “व्यस्त दिनक्रमात सहज समाविष्ट करता येतील अशा आरोग्यदायी सवयी शोधणे आवश्यक आहे. माझ्यासाठी सकाळ म्हणजे सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात. पौष्टिक आहाराची निवड आणि कॅलिफोर्निया बदामांसारख्या साध्या सवयी आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरतात.”
साक्षी अग्रवाल, शिल्पा मेहर आणि हर्षा खत्री यांनीदेखील आधुनिक जीवनशैलीत आरोग्यदायी खाद्य सवयी कशा रुजवता येतील याबाबत आपले अनुभव मांडले. लहान पण सातत्यपूर्ण सवयी दीर्घकालीन आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
परिसंवादाच्या समारोपावेळी तज्ज्ञांनी निरोगी जीवनशैलीचा पाया हा रोजच्या छोट्या आणि सातत्यपूर्ण निर्णयांमध्ये दडलेला असल्याचे सांगत, सकाळच्या दिनचर्येत पौष्टिकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.





