उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात वाढ झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, थकवा यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत केवळ पाणी पिणे पुरेसे नसून, पाण्याने समृद्ध फळांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक ठरते.
कोणत्या फळांत किती पाणी?
- कलिंगड : सुमारे ९० ते ९२ टक्के
- काकडी : सुमारे ९५ ते ९६ टक्के
- खरबूज : सुमारे ८८ ते ९० टक्के
- संत्रे : सुमारे ८६ ते ८८ टक्के
- मोसंबी : सुमारे ८८ ते ९० टक्के
- अननस : सुमारे ८५ ते ८७ टक्के
- स्ट्रॉबेरी : सुमारे ९० ते ९१ टक्के
- आंबा : सुमारे ८० ते ८३ टक्के
- सफरचंद : सुमारे ८४ ते ८६ टक्के
पाणीयुक्त फळांचे फायदे
पाण्याने समृद्ध फळे शरीराला आवश्यक द्रवपदार्थ पुरवतात आणि शरीरात थंडावा निर्माण करतात. तसेच ही फळे त्वचा निरोगी ठेवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यातही या फळांचा मोठा वाटा असतो.
उन्हाळ्यात ताजेतवाने आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात या फळांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.





