India Vs Pakistan : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला घाबरला पाकिस्तान! शरण येण्यास झाला तयार
नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराने मिळून पाकिस्तानातील लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 9 दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ले करून त्यांचा पूर्णपणे नायनाट केला. या कारवाईने पाकिस्तानात खळबळ उडाली असून, तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. भारताच्या या धडाडीच्या कारवाईनंतर आता पाकिस्तान घाबरला असून, सरेंडर करण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानचा सूर बदलला : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला कडक प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. मात्र, आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा सूर पूर्णपणे बदलला आहे. स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले, “पाकिस्तानला युद्ध नको आहे. आम्ही फक्त स्वसंरक्षणासाठी तयार आहोत. भारतानेही आपली कारवाई थांबवावी.” यावरून पाकिस्तान भारताच्या दमदार कारवाईपुढे नरमल्याचे स्पष्ट दिसत आहे.
‘युद्ध कोणालाच परवडणार नाही’: आसिफ पुढे म्हणाले, “भारताशी युद्धाचा विचार पाकिस्तानसाठी योग्य नाही आणि भारतासाठीही तो फायदेशीर ठरणार नाही. आम्ही कोणतीही आक्रमक पावले उचलणार नाही, पण भारतानेही संयम दाखवावा.” या विधानातून पाकिस्तानची हतबलता आणि भारताच्या सैन्यशक्तीपुढे नमते घेण्याची तयारी दिसून येते.
जागतिक पातळीवर भारताच्या कारवाईचं कौतुक : ऑपरेशन सिंदूरच्या या यशस्वी कारवाईनंतर जागतिक पातळीवर भारताच्या धोरण आणि सैन्यशक्तीचं कौतुक होत आहे. पहलगाम येथील हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता आणि 20 जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारताने अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक कारवाई करून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Khawaja Asif, Pakistani defense minister says, Pakistan has to defend itself but if India stops … Pakistan also stops.
“If India is ready to back down, we are ready to wrap things up”
So Pakistan offers an end to the escalation and peace. pic.twitter.com/pZLVTa2JJp
— International Insider (@InterInsider1) May 7, 2025
पाकिस्तानात आणीबाणी : भारताच्या मिसाईल हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले असून, यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे पाकिस्तान सरकारला देशात आणीबाणी जाहीर करावी लागली. भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देण्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
भारताचा इशारा : भारताने स्पष्ट केलं आहे की, ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवरच लक्ष केंद्रित करून करण्यात आली असून, पाकिस्तानच्या लष्करी तळांना हात लावण्यात आलेला नाही. तरीही, भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे की, दहशतवादाला पाठिंबा देण्याची किंमत त्यांना भविष्यातही चुकवावी लागेल.
या कारवाईने भारताने पुन्हा एकदा आपली ‘झिरो टॉलरन्स टू टेररिझम’ ही नीती जगासमोर मांडली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताच्या सामरिक आणि लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन जगभरात झालं आहे.