नऱ्हेतील भगिनींची एकच हाक – “भूपेंद्रभाऊ नगरसेवक होऊ दे!”; हजारो महिलांनी रक्षाबंधनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांना बांधली राखी; ‘माहेरची साडी’ आहेर

By: Editor_Pratik

On: Saturday, August 9, 2025 12:01 PM

Google News
Follow Us

धायरी/नऱ्हे : रक्षाबंधनाचा पवित्र सण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणारा देखणा सोहळा रविवारी नऱ्हेमध्ये पार पडला. कृष्णाई नगर येथील भूपेंद्र मोरे जनसंपर्क कार्यालयात हजारो महिला-भगिनींनी उपस्थित राहून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांना राखी बांधली. आपुलकीच्या या धाग्यातून महिलांनी एकच मागणी व्यक्त केली – “भूपेंद्रभाऊ नगरसेवक होऊ दे!”

पावसातही उत्साह ओसंडून वाहिला

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांची प्रचंड गर्दी मोरे यांना राखी बांधण्यासाठी जमली होती. पावसाळी वातावरण असूनही भगिनींच्या उत्साहात किंचितही कमी जाणवली नाही. महिला मोरे यांना राखी बांधण्यासाठी रांगेत उभ्या होत्या, त्यावेळी वातावरणात सणासुदीची आणि आत्मीयतेची अनोखी रंगत दिसून येत होती.

कार्याची घेतली दाद

महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहणे, परिसरातील वाहणारे ड्रेनेजपासून इतर नागरी सुविधांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ठामपणे आवाज उठवणे— या कामगिरीची उपस्थित भगिनींनी मनापासून प्रशंसा केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोरे यांनी केलेली कामे अनेकांच्या मनात ठसा उमटवणारी ठरली आहेत.

“माहेरची साडी” – खास आहेर

या सोहळ्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने भूपेंद्र मोरे यांनी उपस्थित प्रत्येक भगिनीला “माहेरची साडी” विशेष आहेर म्हणून दिली. हा उपक्रम महिलांसाठी आनंददायी ठरला.

भूपेंद्र मोरे यांची प्रतिक्रिया

या प्रसंगी बोलताना भूपेंद्र मोरे म्हणाले –
“रक्षाबंधन हे फक्त निमित्त आहे. महिला-भगिनींसाठी मी कायमस्वरूपी तत्पर राहिलो आहे आणि राहीन. त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी, नवे उपक्रम राबवण्यासाठी मी सदैव सज्ज आहे. हा धागा केवळ राखीचा नाही, तर विश्वासाचा आहे.”

मान्यवरांची उपस्थिती आणि आयोजन

या कार्यक्रमाला सोनाली नायर, प्रियांका सिंग, सविता डोके, कौशल्या खोडके, संगीता खोडके, सुवर्णा बिडकर, नम्रता लाड आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवराज्य समूहचे हरीश वैद्य, लतीफ शेख, प्रशिक दारुंडे, सुनील पढेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

राखीचा धागा, विश्वासाचा बंध

या दिवशी नऱ्हे परिसरात फक्त राखीच्या धाग्याचा सुगंध नव्हता, तर विश्वास, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुगंध दरवळत होता. महिलांच्या मनातील अपेक्षा आणि मोरे यांच्या कार्याची छाप यामुळे हा सोहळा केवळ रक्षाबंधनापुरता मर्यादित न राहता, एक समाजभावनेचा उत्सव ठरला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now