कंपनीच्या वतीने ३०० कोटी रुपयांचा रस्ता पायाभूत सुविधा प्रकल्प सादर
कोल्हापुरात प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे या उद्देशाने रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेडने ३०० कोटी रुपयांचा परिवर्तनकारी रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रगत बांधकाम तंत्रांचा वापर करून टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करून वाहनांच्या वाढत्या वाहतुकीला सामावून घेणे आणि विद्यमान रस्त्यांच्या रूंदीकरणाद्वारे व मजबूतीकरणाद्वारे त्यांमध्ये सुधारणा करणे, या दृष्टीने या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. प्रमुख औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांमधील वाहतुकीची सोय या प्रकल्पामुळे वाढणार आहे. त्यामुळे सुरळीत प्रवास आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन मिळणार आहे.
पावसाचे पाणी साठवणे, ग्रीन लँडस्केपिंग आणि पर्यावरणपूरक साहित्य यांचा समावेश असलेल्या शाश्वत पद्धतींवर भर देणे हा या घडामोडीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातून पर्यावरणपूरक वाटचालीची कंपनीची कटिबद्धता दिसून येते. हा प्रकल्प ५३ किमीचा असून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्यात नवीन अधिक क्षमतेचे रस्ते, पूल आणि उड्डाणपूल बांधण्याचा समावेश आहे. सुरक्षितता आणि प्रवास कार्यक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक वाहतूक चिन्हे,प्रकाशयोजना आणि पादचाऱ्यांसाठी अनुकूल क्षेत्र असलेल्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन प्रणालीही यामध्ये अंमलात आणल्या जातात.
रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुजित मुळे म्हणाले, आम्ही या प्रकल्पाकडे रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांच्या पलीकडे पाहतो – हा कोल्हापूरच्या भविष्यातील विकासाचा चालक आहे. वाहतुकीची समस्या कमी करणे आणि कनेक्टिव्हिटी वाढवणे यासोबतच, आम्ही एका बुद्धिमान, अधिक लवचिक शहरी समुदायाचा पाया रचत आहोत. शाश्वतता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आमचा भर असल्यामुळे ही पायाभूत सुविधा सध्याच्या गरजा पूर्ण करेल आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाचा पाया रचेल याची हमी मिळते. ही योजना म्हणजे आर्थिक संधी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित, अधिक कार्यक्षम वाहतूक कनेक्शनच्या विकासाची आमची दूरदृष्टी आहे.
पायाभूत सुविधांमधील या सुधारणांमुळे व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देऊन कोल्हापूरमधील आर्थिक विकास वाढेल अशी अपेक्षा आहे. सुधारित रस्ते नेटवर्कमुळे लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता सुधारेल, गुंतवणूक आकर्षित होईल आणि शहरी विकासाला चालना मिळेल. याशिवाय, सुरक्षित प्रवासाची सुनिश्चिती करून, वाहतूक कोंडी कमी करून आणि दुर्गम भागातील प्रवेश वाढवून जीवनमान सुधारण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या दृष्टीने हा प्रकल्प म्हणजे धोरणात्मक वाढ आणि तांत्रिक प्रगतीचा प्रतिनिधी आहे. यातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या विकासात कंपनीचे स्थान बळकट होणार असून आधुनिक तंत्रांसह जटिल प्रकल्प राबविण्यात तिची तज्ज्ञता यातून दिसून येते. या उपक्रमामुळे कंपनीचा पोर्टफोलिओही वाढत असून भागधारक, गुंतवणूकदार आणि सरकारी संस्थांमध्ये तिची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढणार आहे.
या प्रकल्पामुळे बांधकाम, अभियांत्रिकी आणि प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे स्थानिक आर्थिक विकासाला हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धती आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करून, रचना कन्स्ट्रक्शन लिमिटेड स्मार्ट आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांमध्ये बेंचमार्क स्थापित करत आहे. या प्रकल्पामुळे उत्कृष्टता आणि शाश्वततेसाठीच्या कंपनीच्या कटिबद्धतेला बळकटी मिळत आहे. यामुळे शहरी पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सिटी उपक्रमांमध्ये भविष्यातील वाढीच्या संधींचा मार्ग मोकळा होणार असून अधिक कनेक्टेड आणि समृद्ध कोल्हापूरचा मजबूत पाया घातला जात आहे.