BIG NEWS : ठाकरे बंधू एकत्र येणार? फटका कोणाला बसणार? 8 वर्षांनंतर पुन्हा तेच; 2 ठाकरेंची युती कोणाला जड जाणार?

BIG NEWS : ठाकरे बंधू एकत्र येणार? फटका कोणाला बसणार? 8 वर्षांनंतर पुन्हा तेच; 2 ठाकरेंची युती कोणाला जड जाणार?

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसल्यानंतर आता वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं Raj Thackeray Interview त म्हणाले. राज यांनी एकत्र येण्यासाठी साद घातल्यानंतर उद्धव यांनीही प्रतिसाद दिला आहे.

मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा, असं Uddhav Thackeray कामगार सेनेच्या मेळाव्यात म्हणाले. त्यामुळे राज यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला असताना उद्धवदेखील टाळी देण्यास सरसावल्याचं चित्र आहे. दोन्ही ठाकरेंच्या विधानांमुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.

राज ठाकरेंसोबत जाण्याची तयारी दर्शवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अटी, शर्ती सांगितल्या आहेत. माझ्यासोबत यायचं असेल, तर मग शिंदेसेना आणि भाजपला सोडा, असं उद्धव यांनी राज यांना अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज यांची भेट झाली होती. तर दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेप्रमुखांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. उद्धव यांनी आज केलेल्या विधानाला याच भेटीगाठींचा संदर्भ आहे.

raj-uddhav thakry

राज यांची साद आणि तिला उद्धव यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे. २०१७ मध्येही अशाच चर्चा सुरु होत्या. त्यावेळी उद्धव यांचा पक्ष एकसंध होता. शिवसेना राज्यातील सरकारमध्ये भाजपसोबत होती. पण मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले. दोन्ही पक्षांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना झाला. या निवडणुकीआधी दोन्ही Thackeray Brother Alliance Formation अशी परिस्थिती होती. राज यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. पण ऐनवेळी युती होऊ शकली नाही.

आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे आताही मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच ते एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. दोन ठाकरे एकत्र आल्याचा फटका शिंदेसेना आणि भाजपला बसू शकतो. मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं वर्चस्व संपवण्याचा चंग भाजपनं बांधला आहे. यंदा मुंबई महापालिकेत आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी भाजपनं ताकद लावली आहे. पण भाजपला राज यांना थेटपणे सोबत घेता येत नाही. राज यांनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका आणि आता शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीवरुन त्यांनी घेतलेला पवित्रा भाजपसाठी अडचणीचा आहे.

शिंदेसेनेच्या माध्यमातून राज यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज महायुतीत आले नाहीत, तरीही त्यांची तोफ महायुतीविरोधात धडाडू नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. राज महायुतीविरोधात बोलले तर भाजप, शिंदेसेनेचं नुकसान होईल. त्यांनी उद्धव यांच्यावर आगपाखड केल्यास भाजप, शिंदेसेनेचा अप्रत्यक्ष फायदा होईल. पण आता सुरु असलेल्या घडामोडी, दोन्ही ठाकरेंनी केलेली विधानं महायुतीसाठी अडचणीची आहेत.

२०१७ मध्ये दोन ठाकरेंची युती होता होता राहिली. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. राज यांची ताकद आताच्या तुलनेत जास्त होती. गेल्या ८ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. दोन्ही ठाकरेंच्या पक्षाची अवस्था बिकट आहे. उद्धव यांच्या पक्षाचे सध्या केवळ २० आमदार आहेत. तर राज यांच्या मनसेचा एकही आमदार नाही. त्यामुळे दोघांना एकमेकांच्या साथीची गरज आहे. दोघे एकत्र आल्यास त्याचा थेट फटका महायुतीला बसेल. त्यामुळे राज आणि उद्धव यांची टाळी सत्ताधाऱ्यांचं नुकसान करणारी ठरेल.