Waqf Board Property In Maharashtra And India : प्रतापगडावरही वक्फ बोर्डाचा दावा! महाराष्ट्रासह भारतातील 256 स्मारकांबाबत धक्कादायक माहिती उघड; सरकार आता ही सर्व स्मारकं…

Waqf Board Property In Maharashtra And India : प्रतापगडावरही वक्फ बोर्डाचा दावा! महाराष्ट्रासह भारतातील 256 स्मारकांबाबत धक्कादायक माहिती उघड; सरकार आता ही सर्व स्मारकं…

Waqf Board Property In Maharashtra And India : महाराष्ट्रासह भारतातील हजारो स्मारके वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत. यापैकी 256 स्मारके आता वक्फ बोर्डाच्या ताब्यात राहणार नाहीत. वक्फच्या ताब्यात असलेली महाराष्ट्रासह भारतातील 256 स्मारकं लवकरचं सरकारांवर सरकार दावा करणार आहे. या स्मारकांबाबत अतिशय धक्कादायक उघडकीस आली आहे.

पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती आली समोर…मुळशी, भोर, पुरंदर, हवेली, आणि खेडमधील पुढील ३२ गावांची…

दिल्लीतील उग्रसेन बावडी असो की पुराण किल्ला. महाराष्ट्रातील प्रतापगड, गोंदिया किल्ला, बुलढाण्यातील फतेहखेडा मशीद आदी स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार आहे. इतकचं नाही तर देशात अशी 256 राष्ट्रीय स्मारके आहेत जी वक्फच्या हातातून जाणार असल्याचे जवळपसा निश्चित आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही याची पुष्टी केली आहे.

ही सर्व एएसआय संरक्षित राष्ट्रीय स्मारके आहेत, ज्यावर वक्फ बोर्डानेही दावा केला आहे. मात्र, ही स्मारके वक्फ बोर्डाला देणगी म्हणून मिळालेले नाहीत. यावर वक्फच्या दाव्याला फक्त एकच आधार आहे. पूर्वी ते मुस्लिम धर्माचे लोक वापरत होते. म्हणून, वक्फ बाय युजर नियमांनुसार, बोर्डाने ते आपली मालमत्ता म्हणून घोषित केले.

अभिनेत्रीला न सांगता दिग्दर्शकाने शूट केला बलात्काराचा सीन, भडकलेल्या अभिनेत्रीने नंतर केलेलं असं काही की…

8 एप्रिल रोजी वक्फ (दुरुस्ती) विधेयक नवीन कायदा बनला आहे. त्यानंतर नवीन कायद्यानुसार, वक्फ बोर्डाला पुढील 6 महिन्यांत त्यांच्या सर्व मालमत्तांचे तपशील आणि कागदपत्रे केंद्रीय ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागतील. जर वक्फ वापरकर्त्याच्या मालकीच्या मालमत्तेची कागदपत्रे उपलब्ध नसतील, तर त्यावरील मंडळाचा दावा आपोआप संपेल आणि याची मालकी एएसआयकडे जाईल. 6 महिन्यांनंतर, पोर्टलवर तपशील अपलोड करण्यासाठी आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच वक्फ बोर्डाचे दावे जास्तीत जास्त एका वर्षाच्या आत संपतील. नवीन कायद्यानुसार, जर एखाद्या स्मारकाला प्राचीन स्मारके (संरक्षण) कायदा, 1904 किंवा 1958 च्या सुधारित कायद्यानुसार राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले. जर वक्फ बोर्डाने ते त्यांची मालमत्ता म्हणून घोषित केले, तर ते ASI संरक्षित मानले जाईल. त्यावर वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येईल.

Pune Congress : पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार; आधी धंगेकर आता संग्राम थोपटेंच्या पाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा, डॅमेज कंट्रोलसाठी पक्षापुढं मोठं आव्हान

pratapgad

वक्फ बोर्डाने घोषित केलेल्या मालमत्तेचे नाव एएसआय रेकॉर्डच्या आधारे देण्यात आले आहे. एएसआयने त्यांच्या अहवालात दुहेरी मालकीचाही उल्लेख केला आहे. त्यात एकूण 256 राष्ट्रीय स्मारकांची यादी आढळली. एएसआयकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नागपूर मंडळातील एकूण 94 राष्ट्रीय संरक्षित स्मारके असल्याचे सांगण्यात आले. वक्फ यापैकी 5 जागांवर वक्फने आपली मालमत्ता म्हणून दावा केला आहे. यामध्ये गोंदियातील प्रतापगड किल्ला, बुलढाण्यातील फत्तेखेडा मशीद, रोहिणखेड मशीद, वर्धा येथील पौना आदींचा समावेश आहे.

Paneer : पनीरबाबात अत्यंत धक्कादायक खुलासा; 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत समोर आले भयानक सत्य

महाराष्ट्र वक्फ बोर्डाने एएसआयला पाठवलेल्या मालमत्तेच्या तपशीलात गोंदिया किल्ल्याचे नाव देखील समाविष्ट आहे. गोंदियातील प्रतापगड किल्ला 1922 मध्ये एएसआयने संरक्षित केला होता. तो एका हिंदू राजाने बांधला होता. 2004 मध्ये जेव्हा महाराष्ट्र वक्फ बोर्डाने ते त्यांच्या मालमत्ते म्हणून नोंदणीकृत केले तेव्हा तिचे नाव ख्वाजा उस्मान गनी हसन दर्गा सोसायटी प्रतापगड असे ठेवण्यात आले.

BIG NEWS : ठाकरे बंधूनंतर आता अजितदादा-शरद पवारही एकत्र येणार? पवार घराण्यातील व्यक्तीनेच…