Maharashtra rain update: Heavy rainfall lashes Raigad : महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल आहे. अशातच पुढचे दोन दिवस रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा यासह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित प्रशासनकडून घेण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमामात अतिवृष्टी सुरु आहे. उद्यादेखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रम शाळा, व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्र यांना उद्या २० ऑगस्ट रोजी सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Rain Update : पावसाचा कहर, पुढील १० तास धोक्याचे; लोकल सेवा विस्कळीत, विमान उड्डाणांवर परिणाम, शाळा- महाविद्यालयांना सुट्टी
याशिवाय लोणावळ्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करता लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.