रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना! सप्टेंबरपासून काहींना रेशन मिळणार नाही — यादीत तुमचं नाव आहे का? त्वरित तपासा!

By: Editor_Pratik

On: Tuesday, July 22, 2025 10:15 AM

Ration-card
Google News
Follow Us

राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभ घेणाऱ्यांसाठी आता ‘ई-केवायसी’ (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ऐतिहासिक निर्णय : नवरा-बायकोचे गुप्त कॉल आता कायदेशीर पुरावा! घटस्फोटाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

वेळोवेळी संधी मिळूनही केवायसी अपूर्ण

शासनाने ई-केवायसीसाठी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. तरीही शहापूर तालुक्यातील तब्बल 43 हजार शिधापत्रिका धारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे 31 जुलैच्या आत ई-केवायसी न करणाऱ्यांना सप्टेंबरपासून रेशनवर धान्य मिळणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात होणार ‘इतकी’ वाढ

केवायसी कुठे व कशी करावी?

ई-केवायसी करण्यासाठी रेशनकार्डधारकांनी खालीलपैकी कोणतीही एक पद्धत वापरावी:

  • नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन, आधार क्रमांक आणि रेशन कार्ड तपशीलासह केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

  • प्ले स्टोअरवरून ‘मेरा केवायसी’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून घरी बसून सुद्धा ही प्रक्रिया करता येईल.

काय होणार केवायसी न केल्यास?

जर तुम्ही दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमच्या रेशन कार्डवरील धान्याचा लाभ सप्टेंबरपासून थांबवला जाईल.

त्यामुळे ज्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी त्वरित पुढाकार घेऊन ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासन आणि संबंधित विभागांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी ! जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख जाहीर

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

फोर्स मोटर्स

July 23, 2026

July 23, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026