Pune Prahar : आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम चालू करण्यासाठी मागणी करणार : संग्राम शेवाळे

167

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य आज कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. यावेळी सरकार यंत्रणाबरोबर सामाजिक काम करणार्‍या चळवळीमध्ये उतरल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे पण प्रशिक्षण न घेता काम करणे धोक्याचे ठरू शकते. यामध्ये काम करत असताना कुशल आणि सक्षम लोक हवेत. यामुळे सरकार यंत्रणेचा ताण आणि दबाव कमी होईल. आणि काम करणे सोपे होईल यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी हा अभ्यासक्रम चालू करावा अशी मागणी जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे करणार आहेत. अशी माहिती संग्राम शेवाळे यांनी ‘पुणे प्रहार’शी बोलताना दिली.

महाराष्ट्रात भूकंप, महापूर, वादळ या सारख्या आपत्ती अचानक येतात तेव्हा या अभ्यासक्रमाचा फायदा होऊ शकतो. अशा वेळी सरकार यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे या विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो. जिल्हा व्यवस्थापन कार्यालय आणि एनडीआरएफशी संलग्न ठेऊन साधनसामग्री उपलब्ध ठेऊन यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. त्यामुळे महाविद्यालयान पातळीवर एक सक्षम टीम उपलब्ध राहील.त्यामुळे विद्यापीठाने हा अभ्यासक्रम चालू केला तर खूप हितकारक ठरू शकते आणि संकटाच्या काळात फायद्याचेही ठरू शकते.

दरवर्षी विद्यपीठाअंतर्गत १००० विद्यार्थी ही पदवी घेऊन बाहेर पडले तर खूप फायदा होऊ शकतो. आणि विद्यापीठांतर्गत सगळीकडे याचे उपकेंद्रे चालू करण्यात आली तर अजून चांगले होईल.

यामुळे समाजावर जे संकट येते त्यावेळी याचा खूप फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे ते स्वत:चे संरक्षण करू शकतील असे मला वाटते. या अभ्यासक्रमाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला जात आहे. आणि पुणे विद्यापीठ एक नामांकित विद्यापीठ असून तिथे वेगवेगळ्या आणि नवीन योजना, अभ्यासक्रम चालू करण्यात येतात. त्यामुळे या मागणीचे स्वागत करून हा अभ्यासक्रम चालू करतील अशी मला आशा आहे. अशी मी जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागणी करणार आहे. असे त्यांनी सांगितले.