Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आंदोलनाआधीच सरकारचा मोठा निर्णय

Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईत होण्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मराठा उपसमितीचं पुनर्गठन करून नवे अध्यक्ष नियुक्त केले आहेत.

📌 नवीन अध्यक्षांची नियुक्ती

आतापर्यंत समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते, मात्र आता त्यांच्या जागी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती मराठा समाजाची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा घेणार आहे.

📌 १२ सदस्यांचा समावेश

नव्या समितीत एकूण १२ सदस्य आहेत. त्यामध्ये चंद्रकांत पाटील सदस्य म्हणून कायम आहेत. त्यांच्यासोबतच गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, कोकाटे, मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

📌 आंदोलनाची पार्श्वभूमी

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मोठं आंदोलन होणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन मागील आंदोलनाच्या तुलनेत पाचपट मोठं असेल.

📌 सरकारची भूमिका काय?

आंदोलनाच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय निव्वळ राजकीय डॅमेज कंट्रोल आहे का, की खरोखर मराठा आरक्षणासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत, याबद्दल उत्सुकता आहे. मात्र सरकारच्या या पावलामुळे घडामोडींना वेग आला आहे.