मुंबई- 30 सप्टेंबरपर्यंत पीककर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही घोषणा केली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना हे या कर्जमाफी योजनेचं नाव आहे. 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे. जे नियमित शेतकरी कर्ज भरतात, त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं.









