विश्व सनातन संस्कृतीकडे वळत आहे ! – डॉ. सुधांशू त्रिवेदी

दिल्ली शंखनाद महोत्सव : भारताचे सामरिक धोरण !

 

नवी दिल्ली – पूर्वी सनातन संस्कृतीची खिल्ली उडवणारे लोक आता आयुर्वेदाकडे वळत आहेत. रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. चहा-कॉपीऐवजी ‘हर्बल टी’कडे वळत आहेत. एकेश्वरवादी लोक अनेक देवांवर विश्वास ठेवत आहेत. देशातील १७७ देशांनी भारताच्या ‘योग दिना’च्या ठरावाला संयुक्त राष्ट्र संघात अनुमोदन आहे. मौजमजेत रममाण होणारे युरोपातील देश कुंभमेळ्यामध्ये येत आहेत. हा सनातन संस्कृतीचाच प्रभाव आहे. विश्व हळूहळू सनातन संस्कृतीकडे वळत आहे, हा पालट इतरांना बाधित न करता होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले. ते नवी दिल्लीतील ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त बोलत होते.

गझवा-ए-हिंदला वैचारिक उत्तर देण्यासाठी प्रारंभ करा! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, ‘रॉ’चे माजी अधिकारी

          या महोत्सवात ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ या परिसंवादात बोलतांना ‘रॉ’चे माजी अधिकारी कर्नल आर.एस.एन. सिंह म्हणाले, “आपल्या देशात अंतर्गतही एक पाकिस्तान आहे. प्रत्यक्ष पाकिस्तानात आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवू शकतो; पण देशांतर्गत पाकिस्तानचे काय करणार? या कट्टरतावादी विचारांपासून आपल्याला धोका आहे. भारतीय राजकारणाचा आपण विचार करताना दिसून येते की, येथील देशद्रोह्यांची साथ घेतली आणि अंतर्गत पाकिस्तान्यांची मदत घेतली की, सत्तेत रहाता येते. आपल्या देशातील अंतर्गत पाकिस्तानी ऑपरेशन सिंदूरमुळे फार दुःखी होतात. त्यामुळेच या ‘गझवा-ए-हिंद’ला वैचारिक उत्तर देण्यासाठी प्रारंभ करा.”

           विंग कमांडर विनायक डावरे म्हणाले“‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी खरी कारवाई झाली. सेनेने अचूक लक्ष साध्य करत यापूर्वी शत्रूवर छोट्या स्वरूपात कारवाई झाल्या. ९३ हजार पाक सैनिकांनी १९७१ च्या युद्धाच्या वेळी शरणागती पत्करली; मात्र नॅरेटिव्हच्या लढाईत आपण हरलो. पूर्व पाकिस्तान (बांगलादेश)ला स्वातंत्र्य ‘मुक्ती बाहिनी’मुळे मिळाले. च या नॅरेटिव्हला त्यावेळी भारताने याला विरोध केला नाही.”

           ब्रिगेडियर (निवृत्त) संजय अग्रवाल म्हणाले, “भारत-चीन १९६२ च्या युद्धाविषयी अनेकदा चर्चा होते, मात्र १९६७ च्या युद्धात भारताने चीनला पराभूत केले होते, हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. भारताने आपली शक्ती जाणावी, यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता आहे. देशाने आपले लक्ष्य निर्धारीत करावे.”

           यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष श्री. राहुल कौल कश्मिरी हिंदूंच्या संघर्षाविषयी सांगताना म्हणाले, “कश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाला हे अजूनही सरकार मानायला तयार नाहीत. पर्यटनाने दहशतवाद थांबेल या भ्रमात कोणी राहू नये. जगती जम्मू येथे १६ जानेवारी २०२६ पासून विशेष अभियान सुरु करत आहोत. जम्मू काश्मीरमधील हिंदूंना देशातील सर्व हिंदूंच्या सहकार्याची आवश्यकता आहे.”

           दूरदर्शन (डीडी) न्यूजचे संपादक श्री. अशोक श्रीवास्तव म्हणाले, “‘काही राजकीय नेते हिंदुत्वाला डेंग्यू, मलेरिया, एड्स म्हणतात, तेव्हा प्रसारमाध्यमे शांत बसतात. सध्या इस्लामोफोबियाची चर्चा आहे. प्रत्यक्षात हिंदूफोबिया प्रचंड प्रमाणात आहेत. हिंदूफोबियाविषयी एक अहवाल आहे. भारतात डिसेंबर २०२५ च्या पहिल्या ११ दिवसांत हिंदूंना केवळ ते हिंदू आहेत, म्हणून त्रास देण्याच्या १०४ घटना घडल्या आहेत.”