भारतातील ‘विधवांचं गाव’ – भूतपुरा : सिलिकोसिसचा मृत्यू साजरा करणारा शापित संघर्ष

By: Editor_Pratik

On: Tuesday, July 8, 2025 8:52 AM

village-of-widow1_2025061476927
Google News
Follow Us

भारत देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने धावत असला, तरी अजूनही देशाच्या काही भागांमध्ये माणुसकीला चटका लावणाऱ्या कहाण्या घडतात. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील ‘भूतपुरा’ हे गाव त्याचं एक विदारक उदाहरण ठरतं – जिथे 35 वर्षावरील 70% महिला तरुणपणीच विधवा होतात. त्यामुळे या गावाला ‘विधवांचं गाव’ असंही म्हटलं जातं. पण हा सामाजिक शाप नव्हे – हा औद्योगिक निष्काळजीपणाचा परिणाम आहे.

या गावातल्या शेकडो पुरुषांचा मृत्यू एका विशिष्ट व्याधीमुळे होतो – सिलिकोसिस.
भूतपुरा गाव आणि आसपासच्या परिसरात सँड स्टोनच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. या खाणींमध्ये काम करताना दगड फोडल्यामुळे हवेत उडणाऱ्या धुळीत सिलिका हे विषारी रसायन असते, जे मजुरांच्या फुफ्फुसात प्रवेश करते. परिणामी त्यांना सिलिकोसिस नावाचा गंभीर आजार होतो, ज्यामुळे:

सतत खोकला येतो,

तोंडातून रक्त पडते,

श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो,

आणि यावर उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू निश्चित होतो.

या आजारावर सध्या ठोस उपचार नाहीत, आणि एकदा झाल्यावर व्यक्ती फारतर पाच वर्षेच जगू शकतो, असा डॉक्टरांचा इशारा आहे.

रोजगारासाठी मृत्यूचा स्वीकार : या गावातील महिलांची कहाणी ही अजून भयावह आहे. पतीचे निधन झाल्यानंतर, उपजीविकेसाठी त्या महिलांनाही त्याच खाणीत काम करावं लागतं. त्यांना माहिती असतं की हीच खाण त्यांच्या पतीचा मृत्यू घडवणारी ठरली, पण हातात दुसरा पर्यायच नसतो. दिवसाला मिळणारे फक्त 300-400 रुपये हेच त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य आहे.

एक विधवा महिला सांगते की, तिचा पती सिलिकोसिसमुळे गेला आणि आता ती स्वतःही त्याच आजाराने त्रस्त आहे. त्यांची मुलंही त्याच खाणीत काम करत असून, ते लहान वयातच श्वासाच्या समस्यांनी ग्रासले गेले आहेत.

डॉक्टरांचे धक्कादायक निरीक्षण : भूतपुरा परिसरातील रुग्णालयात दररोज 50-60 रुग्ण श्वासासंबंधी आजारांसाठी येतात, त्यात अर्धे रुग्ण सिलिकोसिसने बाधित असतात. एका 45 वर्षीय व्यक्तीची फुफ्फुसे पूर्णपणे निकामी झाली होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

“या गावात कोणीच म्हातारे होत नाहीत” : हे वाक्य एखाद्या कथासारखं वाटतं, पण हीच भूतपुरा गावाची काळी वस्तुस्थिती आहे. याठिकाणी लोक तरुणपणीच मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे या गावात वृद्ध दिसत नाहीत. हे केवळ भूतपुरा गावापुरते मर्यादित नसून, भारतातील अनेक खाणींच्या अव्यवस्थित व असुरक्षित व्यवस्थेचे परिणाम आहेत.

काय करायला हवं?

सिलिकोसिससारख्या आजारांवर तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

सुरक्षित खाणकामासाठी कठोर नियम आणि त्यांची अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे.

वैकल्पिक रोजगारासाठी राज्य व केंद्र सरकारने योजनांचा अवलंब करावा.

साक्षरता, आरोग्य व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.

भूतपुरा गावाच्या कहाणीने आपल्याला अंतर्मुख होण्यास भाग पाडलं पाहिजे. श्रम करणारं, राबणारं, आणि आपल्या घामाने देश घडवणारं हेच कामगार वर्ग, आज मृत्यूच्या छायेत जगतो आहे.

आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे – हा मृत्यूचा व्यवसाय थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपलं प्रशासन, सरकार आणि समाज यावर कधी लक्ष देईल?

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026