Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जामसाळा नवीन या गावात पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिंदेवाही पोलिसांत आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्वास बाबूराव चौधरी असे मृतकाचे नाव आहे तर वैशाली दुर्वास चौधरी असे आरोपी पत्नीचे नाव असून आरोपी महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयताची आई सुनंदा बाबुराव चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. दारूचे व्यसन त्यात पती सारखा चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दररोज त्यांचे खटके उडायचे, या प्रकाराला वैतागून पत्नीने टोकाचे पाऊल उचलले.
वृत्तानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या जामसाळा गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.बाबुराव चौधरी याला दारुचे व्यसन होते. त्यात तो पत्नी वैशाली हिच्या चरित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात नेहमी वाद होत असे.शनिवारला त्यांच्यात वाद झाला. झटापटीही झाली.
यावेळी वैशालीचा पारा भडकला.रागाचा भरात तिने रुमालाने गळा आवळून पतीचा जीव घेतला.या घटनेने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. सिदेवाही पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रमाबाई नगरमध्ये कविता रायपुरे (५५) आणि त्यांचा मुलगा सुरेश रायपुरे (३१) राहतात. सुरेश हा खासगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो शनिवारी रात्री आठ वाजता कामावर गेला होता. कविता रायपुरे ही घरात एकटीच होती.
घरासमोरील गेटला कुलूप लावले होते. रविवारी सकाळी शेजारी राहणारी मुलगी ममता अलोणे हिने गेटचे कुलूप काढून दार ठोठावले. मात्र घराचे दार उघडत नव्हते. नंतर काही वेळात दार उघडताच कविता यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
अतिशय विद्रूप स्थितीत तिचा खून करण्यात आला होता. चेहरा, कपाळ आणि छातीवर मार होते.राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. कविता रायपुरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी राजुरा येथे रमाबाई नगर येथेच राहत असून दुसरी मुलगी यवतमाळ येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.