‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने थायलंडमधील आंतराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर !

312
स्त्रियांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी समान संधी ! – संशोधनाचा निष्कर्ष

 

चांगले किंवा वाईट व्यक्तिमत्व हे आपल्या जीवनातील आध्यात्मिक पैलूशी संबंधित असतेउच्च आध्यात्मिक पातळी असलेला अर्थात् चांगली साधना करणारा नेता हा नि:स्वार्थी असतो आणि तो समाजाच्या भल्यासाठी कार्य करतोयाउलट ज्याची आध्यात्मिक पातळी अल्प असते अर्थात साधना न करणारा नेता इतरांविषयी अल्प विचार करतोस्त्री असो वा पुरुष बहुतेक नेते साधना करत नाहीतत्यामुळे ते नकारात्मकतेने लवकर प्रभावित होतातत्यामुळे त्यांच्या कृती आणि निर्णय यांचा समाजावर वाईट परिणाम होतोआध्यात्मिक साधना केल्याने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी अन् खर्‍या अर्थाने नेते बनण्यासाठी सम प्रमाणात साहाय्य करतेअसे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या सौश्वेता क्लार्क यांनी केले.

त्या बँकॉकथायलंड येथे ‘टुमारो पिपल’ या संघटनेने आयोजित केलेल्या ‘14 व्या महिला नेतृत्व आणि सक्षमीकरण परिषद, 2023’ (डब्ल्युएलईसी 2023) या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होत्याया परिषदेत सौश्वेता यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘अध्यात्म महिला नेत्यांना कसे सक्षम बनवते’ या विषयावर शोधनिबंध सादर केलामहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेततर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटातील साधक श्रीशॉन क्लार्क आणि सौश्वेता क्लार्क या सहलेखक आहेत.

सौश्वेता या वेळी म्हणाल्या की, उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्रीपुरुष आणि अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्रीपुरुष अशा दोन गटांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु..एस्.) द्वारे चाचणी घेण्यात आलीउच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्रीपुरुषांमध्ये सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात आढळून आलीतर अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्रीपुरुषांमध्ये नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळून आलीअन्य एका चाचणीमध्ये असे आढळून आले कीकेवळ 30 मिनिटे नामजप केल्यावर स्त्रीपुरुषांमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ लक्षणीयरित्या अल्प झालीया संपूर्ण प्रयोगांचे निष्कर्ष मांडतांना सौश्वेता म्हणाल्या कीखर्‍या अर्थाने नेता बनण्यासाठी प्रत्येकाने आपले स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक जीवन जगण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे.